वीर साम्राज्य ग्रुप, अकलूजचा समाजसेवेचा अनोखा उपक्रम — १५ वर्षांची सततची परंपरा कायम!
वीर साम्राज्य ग्रुप, अकलूजचा समाजसेवेचा अनोखा उपक्रम — १५ वर्षांची सततची परंपरा कायम!
अकलूज : प्रतिनिधी
समाजसेवा, एकता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या वीर साम्राज्य ग्रुप, अकलूज यांची समाजहितातील कार्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. पंधरा वर्षांपासून दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा ग्रुप रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असून, या सेवाभावी उपक्रमाने समाजात आदर्श निर्माण केला आहे.

रक्तदान म्हणजे केवळ दान नव्हे, तर एखाद्याचे जीवन वाचवण्याचे थोर कार्य असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. समाजातील सेवाभाव आणि मानवी मूल्यांप्रती असलेली निष्ठा वीर साम्राज्य ग्रुपच्या प्रत्येक कार्यातून अधोरेखित होते.याचबरोबर ग्रुपने वारकऱ्यांसाठी मोफत भोजन, पूरग्रस्तांना मदत, शैक्षणिक साहाय्य, कपडे व अन्न वितरण, तसेच सामाजिक जागृतीचे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

यंदाच्या पाडव्याच्या निमित्ताने ग्रुपच्या वतीने डॉ. रणजित कागदे Ph.D. (Computer Science & Engineering, Veltech University, Chennai



